गावाविषयी माहिती

वैतरणा नदीच्या काठी वसलेले गालतरे गाव हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. गालतरे गावात पश्चिममुखी श्री गणेश मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू तसेच गावाच्या उत्तर हद्दीला आई गावदेवी गालतरे मंदिर व गावाच्या दक्षिणेस आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत सोसायटी ( इस्कॉन ) संचालित श्री गोवर्धन एको व्हिलेज ,गालतरे संस्थापित श्री श्री राधा वृन्दावन बिहारी मंदिर तसेच पूर्वेस कोहोज किल्ला पर्वत हि आकर्षक पर्यटन स्थळे सुद्धा आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २४७४ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 2, अंगणवाडी केंद्रे 3, लघुउद्देषीय केंद्र -1 व समाज मंदिर -2 , श्री गोवर्धन एको व्हिलेज , गालतरे संस्थापित गोवर्धन स्कील सेंटर , गालतरे अशा शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात हे प्रमुख पिक घेतले जाते. हरभरा, मुग, उडीद, तूर हि काही जोड पिके भात कापणी केल्यानंतर घेतली जातात. तसेच थोड्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करतात.

गालतरे ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालाय चा  लाभ मिळाला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व 8 सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

भौगोलिक स्थान

गालतरे हे गाव वाडा तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे २६ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ  ६७९  हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण ४२१ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या २४७४ ( २०११ च्या जनगणनेनुसार ) इतकी असून त्यामध्ये १३७४ पुरुष व ११०० महिला यांचा समावेश होतो. गावपातळीवर सर्वे नुसार २२६२ एवढी लोकसंख्या आहे.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावालगत वैतरणा  नदी असून  ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो . येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३५°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी २४ ते ३० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

लोकजीवन

गालतरे गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून हंगामी भाजीपाला पिके घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

गालतरे गावाच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

घटक संख्या
लोकसंख्या २४७४  
पुरुष १३७४
स्त्री ११००
एकूण २४७४  

संस्कृती व परंपरा

गालतरे गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी,पोळा यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे गालतरे गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख उत्तर हद्दीला आई गावदेवी गालतरे मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी वार्षिक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

श्री गणेश मंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर आहे.

पर्यटन स्थळे – कोहोज किल्ला व आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत सोसायटी ( इस्कॉन ) संचालित श्री गोवर्धन एको व्हिलेज ,गालतरे संस्थापित श्री श्री राधा वृन्दावन बिहारी मंदिर

जवळची गावे

गालतरे गाव वाडा तालुक्यातील पश्चिमेस असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

करळगाव, हमरापूर, गुहीर, कुर्ले, नाणे, सांगे, गोऱ्हे, देवळी, वावेघर अशी आसपासची प्रमुख गावे आहेत.